Subscribe Us

Header Ads

भारतीय राज्यघटना : महत्वाची माहिती

  • भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम दोन वर्षेअकरा महीने आणि अठरा दिवस चालले. 
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. 
  • डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 
  • राज्यघटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला गेला व 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अंमलात आली.
  • भारतीय संविधान मुख्यत्वेकरून 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) आधारित आहे.
  • 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.
  • अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर  1949 रोजी स्वीकारला गेला.
  • त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • संपूर्ण संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले.
  • त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • भारताची राज्यघटना तीन विभागात विभागली गेली आहे -उद्देशिकामुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) 
  • मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.
  • सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.
  • सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठं संविधान आहे.
  • भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.
  • सुरुवातीला मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.
  • 42 व्या घटना दुरूस्तीद्वारे ते शब्द उद्देशिकेत घालण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या